ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

उद्धव ठाकरेनी करून दाखवले — मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांच्या फेरबदल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची घबराट

मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात बदल्या होऊ शकतात तर आपले काय अशी भीती पालिकेतील अधिकाऱ्यांना वाटत आहे .जे पूर्वी काँग्रेस किंवा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले आहे तसा प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीतही घडू शकतो कारण पालिकेतील काही बडे अधिकारी बऱ्याच वर्षापासून सेटिंग करून मलईदार खात्यातील आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यांची ही उचलबांगडी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.त्यामुळे हे अधिकारी हवालदिल झाले असून आता आपल्या गॉडफादर मार्फत आपली बदली रोखण्याच्या हालचाली करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे

error: Content is protected !!