ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कडू – राणा वाद अखेर मिटला

अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढली . त्यानंतर सोमवारी रवि राणा यांनी घडल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले शब्द मागे घेतले .त्यानंतर आज बचु कडू यांनीही रणांची ही पहिली चूक असल्याने त्यांना माफ करतो असे सांगून वाद मीटवला .

error: Content is protected !!