ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

उर्फी जावेद हिचे थोबाड फोडण्याची चित्र वाघ यांची धमकी

नाशिक – चित्र वाघ या अभिनेत्री उर्फी जावेदवर चांगल्याच संतापल्या आहेत उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई मला ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेल असा थेट इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर आगपाखड केली. त्याचबरोबर अभिनेत्री उर्फी जावेदवर प्रचंड संताप व्यक्त करत उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाही, ही बाई मला ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेल असा थेट इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे. दरम्यान अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना जाणून-बुजून धर्मवीर म्हणण्यात येते, ते धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक आहेत इतिहासाची काही दाखले देत त्यांनी हे वक्तव्य केले होते. मात्र या विधानावर आता भाजप आणि शिंदे गटाला आक्षेप असून या दोन्ही पक्षांकडून अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देखील शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून शहरातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. भाजपच्या आंदोलनाच्या वेळी महिला मोर्चाच्या चित्रा वाघ यादेखील उपस्थित होत्या.

यावेळी चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपने नाशिकमध्ये आंदोलन करत अजित पवार यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी अजित पवार यांच्या या विधाराहून विधानावरून टीका केली असून त्या म्हणाल्या, छत्रपती संभाजी राजे यांनी धर्मासाठी खूप काही भोगल आहे, ते धर्मवीर नाही असे अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यांनी बोलणं हे दुर्दैव आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. या वादामुळे पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामकारणाचा मुद्दा उपस्थित झाला असून यावर बोलताना त्या म्हणाल्या, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असं होईलच, मात्र आता मागणी आहे की औरंगाबादचं नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करा अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.

error: Content is protected !!