ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरेंच्या भाषणाची शिवसेनेतील मराठी तरुणांना भूरळ

मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश झाले आहेत . राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर त्याच्या समोरच दुप्पट भोंगे लावून त्यावर मोठ्याने हनुमान चालीसा लावावा असा राजने आदेश दिला .त्यानंतर घाटकोपर चांदिवली आदी भागात मनसैनिकांनी मशिदी समोर तसेच आपल्या शाखांवर भोंगे लाऊन हनुमान चालीसा सुरू केला .पण पोलिसांनी कारवाई सुरू केली मात्र राजच्या त्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपातील तरुणही खुश झाले आहेत .त्यामुळे कदाचित भविष्यात शिवसेना आणि इतर पक्षातील तरुण मनसेत येऊन मनसेची ताकद वाढू शकते

error: Content is protected !!