ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

महापालिका निवडणुकीवर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे विचारमंथन

मुंबई -देशातील सर्वात महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदारांना आज बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. विधानसभा, विधानपरिषद आमदार आणि लोकसभा व राज्यसभा खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व आमदार व खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर महत्त्वाची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे.
देशातील सर्वात महत्त्वाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी भाजपने रणनीती आखली असून मुंबईत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी@9 कार्यक्रम स्थानिक लोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी मुंबईत भाजप घर घर अभियान राबवणार आहे. पालिका निवडणुकीआधी सर्वसामान्य जनतेसोबतचा संपर्क वाढावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांचा पालिकेतील कारभाराची पोलखोल करण्याचेही आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

error: Content is protected !!