ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

हिंदुत्ववाद्यांनी आव्हाडांचे पुतळे जाळले

मुंबई – सध्या राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस दूषित बनत चालले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे रावण कडून रामायणातून राम समजावून सांगा या त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून आज ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले

: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांवर भाजपने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आव्हाडांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, ‘रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.’ त्यांच्या या ट्वीटनंतर शिंदे गटासह भाजपनं हल्लाबोल केला आहे.
आव्हाड ट्वीट करून म्हणाले आहेत की, ”रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण -अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा.” त्यांनी आपल्या या ट्वीटसह ‘आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा’, असं हॅशटॅग देखील दिलं आहे

error: Content is protected !!