ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर’ नामांतराचा स्टेटस ठेवल्यामुळे- कुटूंबियांना मारहाण

औरंगाबाद – जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजरी देण्यात आली. बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात ही घटना घडली आहे. रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर नावाचे व्हाट्सअप स्टेटस आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवले होते. हे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गायकवाड यांच्या घरावर ओळखीच्या 13 आणि अज्ञात 10 ते 15 लोकांनी हल्ला केला.या हल्ल्यात गायकवाड यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची तोडफोडही करण्यात आली.
          याप्रकरणी रुपेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये उमेर मोईन शेख, शहीद आक्रमखा पठाण, सय्यद अजीज अनिस, शेख अख्तर मोईन, मुखिद पाशा मणियार, अरबाज उर्फ बबु अलवार शेख, सय्यद अजीज जुबेर, शेख साबीर गफार, नेहाल तांबोळी, सय्यद शाबाज, नेहाल इनामदार, सलीम अली इनामदार आणि इतर आठ ते 10 आरोपींविरोधात कलम 452,143, 147,149,504,506,336,327,323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

error: Content is protected !!