ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्रमुंबई

वानखेडे यांना धक्का ! आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला

मुंबई/ समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर एन सी बी ने त्यांच्याकडची तपास कडून घेतला असून आता हा तपास एन सी बी चे दुसरे संचालक संजय सिंह हे करणार आहेत .
समीर वानखेडे यांनी क्रुझ वरील रेव्ह पार्टी वर टाकलेल्या धाडी पासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत कारण ही धाड बनावट होती यात आर्यन खान याला मुद्दाम फसवण्यात आले आणि यामागे शहारूख खान यांच्याकडून पैसे उकळण्याचा डाव होता असा आरोप नवाब मलिक यांनी केला तसेच वानखेडे यांनी टाकलेल्या ३६ धडीही बनवत होत्या आणि त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती .त्यानंतर एन सी बी ने दिल्लीत वानखेडे यांची चौकशी केली आणि त्यानंतर आर्यन खान सह सहा प्रकरणाचा तपास वानखेडे यांच्याकडून कडून घेण्यात आला आता हा तपास दिल्ली एन सी बी करणार असून संजय सिंह यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आलीत .

error: Content is protected !!