ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ग्रामपंचायतींचां निवडणुकीत बंडखोरांची सरशी -शिंदे गटाने जिंकल्या 40 जागा सेनेला 27


मुंबई/ महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा शिंदे गटाची सरशी झाली आहे अगदी काही दिवसांपूर्वीच बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने 40 जागा जिंकून शिवसेनेला चौथा क्रमांकावर ढकलले आहे त्यांचे हे यश म्हणजे त्यांच्या बंडखोरीला जनतेकडून मिळालेली मूकसंमतीच म्हणावी लागेल
271 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 81 जागा जिंकल्या आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादीने 53 जागा मिळाल्या शिंदे गटाला 40 तर शिवसेनेला केवळ 27 जागा मिळाल्या काँग्रेसला 22 जागांवर समाधान मानावे लागले.अनेक जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली आहे तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपने बाजी मारीली तर ठाणे पालघर रत्नागिरी या जिल्ह्यात शिंदे गटाला चांगले यश मिळाले आहे त्यांनी शिवसेनेच्या कडून काही ग्रामपंचायती हिस्कवल्या आहेत

error: Content is protected !!