ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150

मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे
मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन घेतले त्यानंतर पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन कार्यकर्त्यांना संबोंधित केले यावेळी. त्यांनी सांगितले की उद्वव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला मी त्यांना मुख्यमंत्री पदाबाबंत त्यांना कधीही शब्द दिला नव्हता म्हणूनच आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरायला हवे कारण आता हिंदु विरोधी राजकारण संपवायला हवे मुंबईकर जनता संपूर्ण शक्तिनिशी एन डी एच्या पाठीशी आहे त्यामुळे एन डी ए मुंबई महापालिका जिंकणारच असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे तसेच लोकांची कामे करा असा आदेश सुधा दिलाय . त्याच बरोबर खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असून फडणवीस शिंदे सरकारचे काम उत्तम रित्या चालले आहे असेही सांगितले तर मुंबई पालिकेवर असलेला शिवसेनेचा भगवा हटवू शकतं नाही असा पलटवार शिवसेनेने केला आहे .

error: Content is protected !!