ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मिशन 150

मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिले . 227 पैकी 150जागा जिकणे भाजपने मुंबईकरांसाठी असे काय केले आहे ते मात्र सांगितले नाही . त्यांनी मुंबईकरांना गृहीत धरले आहेत पण मुंबईकर अंधभक्त नाही त्यामुळे तो कुणाच्याही मागे फरफटत जाणार नाही . त्यामुळे 150 जागा जिंकण्याचा कल्पना विलास हास्यास्पद आहे .अमित शहा यांनी मुंबईकरांना अजून पुरते ओळखलेले नाही .त्यांना हे ठाऊक नसेल की मुंबईकरांचा भाजप वर किती राग आहे . ज. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली आहे त्यासाठी 105 आंदोलकांनी प्राणाचे बलिदान केलेय . पण मुंबईला केंद्राकडून कधीच न्याय मिळाला नाही देशातील एकूण महसुलाच्या 40 टक्के महसूल एकट्या मुंबईतून देशाला मिळतोय त्या बदल्यात मुंबईला काय मिळतेय .आज मुंबईतील अनेक विकास योजना पैशा अभावी पडून आहेत पण त्याकडे केंद्राचे लक्ष नाही उलट मुंबईला आर्थिक राजधानीचा जो बहुमान प्राप्त आहे तो भाजपच्या डोळ्यात खुपतोय .त्यामुळे आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबादला करण्याचा घाट घातला जातोय .त्यासाठी मुंबईतील काही महत्वाच्या संस्था अहमदाबादला शिफ्ट करण्याचा खटाटोप सुरू आहे . मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी मोदी आणि अमितशहांचे गुजराती मारवाडी टपून बसले आहेत . त्यांना मुंबईतून मराठी माणसाला घालवायचे आहे म्हणून त्यांना मुंबई महापालिका हवी आहे .पण या मुंबईत इथला मुंबईकर मराठी माणूस त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही शिवसेनेतल्या दोन चार फितुरांना हाताशी धरून मुंबई जिंकण्याचे स्वप्न जर कुणी पाहत असेल तर त्यांचे ते स्वप्न कदापि सत्यात उतरणार नाही .

error: Content is protected !!