ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ईडीमुळे विरोधक एकत्र आले आहेत -पंतप्रधान

दिल्ली – राहुल गांधी यांच्या आरोपाना लोकभेत उत्तर देताना मोदींनी अदाणींचा उल्लेखच केला नाही . उलट विरोधकांवर टीका करताना विरोधक ईडीमुळे एकत्र आले आहेत अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला

राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. काल लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही पंतप्रधानांनी पलटवार केला. ‘ईडीमुळे विरोधक एकत्र आले, निवडणूक हरल्यानंतर एकत्र आले नाहीत. मतदारांना जे जमलं नाही ते ईडीमुळे शक्य झालं’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली
‘निवडणूक हरले तर ईव्हीएमला शिव्या देतात. निवडणूक आयोगाला शिव्या देतात. निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर सुप्रीम कोर्टाला शिव्या देतात. विरोधक निराशेमध्ये आहेत. मोदींना शिव्या द्या, मोदींवर खोटे आरोप करा तरच मार्ग निघेल, असं काहींना वाटतंय. मागच्या २२वर्षात ते याच गैरसमजामध्ये आहेत. देशाच्या लोकांसाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोदीने प्रत्येक क्षण खर्ची घातला आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘देशाचा मोदीवर विश्वास आहे, हे यांना समजण्याच्या पलीकडे आहे. ८० कोटी लोकांना फुकट धान्य मिळालं, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, ते तुमच्या खोट्या आरोपांवर कसा विश्वास ठेवेल? काही जण स्वत:च्या कुटुंबासाठी जगत आहेत, मी२५ कोटी कुटुंबाच्या घरातला सदस्य आहे. १४० कोटी जनतेचे आशिर्वाद माझ्यासाठी सुरक्षा कवच, मला शिव्या देऊन हे सुरक्षा कवच तुम्ही भेदू शकत नाही’, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

error: Content is protected !!