ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पुण्यातील शाळेत ६० विध्यार्थ्यांना किचडीतून विषबाधा


पुणे – पुण्याच्या हुतात्मा राजगुरूविद्यालयात ६० विध्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याने खळबळ माजली आहे या सर्व विध्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी चौकशीचे आदश देण्यात आले आहेत

राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचं आरोग्य नीट राहवं म्हणून यात कडधान्यदेखील दिले जातात. मात्र विद्यार्थ्यांना दुपारी शाळेत दिलेला पोषण आहारच त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला आहे. पुण्यातील राजगुरुनगरमधील एका शाळेत तब्बल 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरु विद्यालयात हा प्रकार घडला आहे. मुलांना दुपारच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. शाळेत रोज मुलांना दुपारी जेवणाच्या सुट्टीत खिचडी भात दिला जातो. आजदेखील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी हा खिचडी भात खाल्ला. त्यानंतर अर्ध्या तासांनी६० मुलांना विषबाधा झाल्याचं समोर आलंं. भात खाल्यानंतर मुलांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. आज दुपारी सुमारे दोन वाजता हा प्रकार घडला आहे. तीन वाजता विषबाधा झाल्याचं समोर आलं. त्यानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने सगळे विद्यार्थी सुखरुप असल्याची माहिती आह

हा सगळा प्रकार पालकांना कळल्यावर पालक रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत चांगलात संताप व्यक्त केला आहे. शाळा प्रशासनावर ते चांगलेच संतापले होते. मुलांच्या जीवाशी खेळ करु नका, असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सुदैवाने सगळे विद्यार्थी सुखरुप आहेत. मात्र १०० पैकी ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने सगळीकडून रोष व्यक्त केला जात आहे. आमच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळेच आमच्या मुलांना त्रास झाला, असल्याचे पालकांकडून सांगण्यात आलं आहे.

error: Content is protected !!