ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

स्वराज्य फाऊंडेशनच्या आरती संग्रहाचे यशवंत जाधव यांच्याहस्ते अनावरण

मुंबई – : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी आबालवृद्ध करत आहेत. घराघरांत उत्सवाचं वातावरण तयार होत आहे. सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपात दाखल झाले असून सजावट अंतिम टप्यात पोहचली आहे. पण त्याच्याच जोडीने आरती संग्रहांची गरज देखील भासत आहे. हीच गरज ओळखून “स्वराज्य फाऊंडेशन” चे संस्थापक अध्यक्ष उदय पवार यांनी आरती संग्रह तयार करून घेतले.
गणराजाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या शुभहस्ते या आरती संग्रहाचे अनावरण बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयातील त्यांच्या दालनात करण्यात आले. याप्रसंगी स्वराज्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उदय पवार,पत्रकार राजेंद्र साळसकर,उद्योजक अविनाश जगताप, कवि गुरूदत्त वागदेकर,अमित बारे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!