ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या

हत्या करून पळून गेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

अंबरनाथ /संशय हा विचित्र रोग आहे.त्याला प्रचंड जडला तो माणूस विकृतीकडे जातो.याच संशयातून मोठ कांड घडलं.विकृत पती आपल्या नवविवाहित पत्नीवर वारंवार संशय घ्यायचा तिचे परपुरुषा सोबत अनैतिक संबंध आहेत.या अनैतिक संबंधाच्या संशयातुन शेवटी त्या नवविवाहित पत्नीचा कायमचा काटाचं काढण्यात आला.

अंबरनाथ शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा येथे २२ऑगस्ट रोजी घडली.पत्नी सुशीला हीच दीड महिण्यापूर्वी आरोपी पती सुरज सोबत एका मंदिरात लग्न झाले होते.त्यानंतर ती उल्हासनगरच्या कॅम्प – ५ येथील गायकवाड पाडा येथे एका भाड्याच्या खोली सूरज सोबत राहत होती.पती सुरज याला दारूचे प्रचंड व्यसन होते.घरी दारू पिऊन आल्यावर पत्नीशी रोजच खटके उडत होते.पुन्हा जबर वाद २२ऑगस्ट रोजी झाले. त्यावेळी राहत्या घरात तिच्यावर रागाच्या भरात तिच्या परकरच्या लेसने गळा आवळून चेहऱ्यावर रॉकेल टाकत तिला जाळून हत्या केली.मृत सुशीलाची हत्या करून घराला कुलूप लावून पडून गेला होता.हत्या झाल्यानंतर सात ते आठ दिवसांनी मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.आपल्या घरात मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याची माहिती मिळताच घरमालकाने पोलिसांच्या सहाय्याने घरचे दार उघडले असता कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळून आला.हत्या झाल्यापासून आरोपी पती सुरज हा पळून गेला होता.

उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपीची माहिती काढली.आरोपी सूरज हा मजुरी करणारा नाका कामगार होता.तो नाक्यावर येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचत सूरजला ताब्यात घेतले.उल्हासनगर गुन्हे शाखेनं याप्रकरणी समांतर तपास करत सुरजच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत त्याने पत्नी सुशीलाच्या हत्येची कबुली दिली. यानंतर त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!