ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचेसर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्याने शेकापचे जयंत पाटील पराभूत !

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे
सर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्याने
शेकापचे जयंत पाटील पराभूत ! मिलिंद नार्वेकर मात्र विजयी
मुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झलेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसची ८ मते फुटल्याने शरद पवारांनी पाठींबा दिलेले शेकापचे जयंत पाटील पडले. मात्र ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. भाजपाकडे ११० मते असताना त्यांना १३० मते मिळाली यात हितेंद्र ठाकुरांची बविआ ची ३ , सपाची २ , काँग्रेसच्या फुटीरांची ३ अशा मतांचा समावेश आहे .
1) पंकजा मुंडे – 26 मतं
2) परिणय फुके – २६ मतं
3) सदाभाऊ खोत – 26 मतं
4) अमित गोरखे – २६ मतं
5) योगेश टिळेकर – 2६ मतं
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार
1) शिवाजीराव गर्जे – 23 मतं
2) राजेश विटेकर – 24 मतं
शिवसेना विजयी उमेदवार
1) कृपाल तुमाने – 25 मतं
2) भावना गवळी – 24 मतं
काँग्रेसच्या विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव – 25 मतं
मिलिंद नार्वेकर [ठाकरे गट २४
शेकाप जयंत पाटील -१२ [पराभूत ]

error: Content is protected !!