ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मला हलक्यात घेऊ नका तुम्हाला पुरून उरलोय – एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


मुंबई/सत्तांतर झाले नसते तर लाखो कोटी रुपयांच्या योजना आल्या नसत्या. लाडकी बहीण योजना आली नसती. जेष्ठांना सवलतीच्या योजनांचा लाभ मिळाला नसता. बँकेमध्ये पैसे आले नसते .हे सरकार पंधरा दिवसात पडेल, एक महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल असे काही लोक म्हणत होते. पण हा एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरला. मी घासून पुसून नाही, तर ठासून दोन वर्ष पूर्ण केली. तेव्हा मला हलक्यात देऊ नका . मी लाळणारा नाही.पळवणारा आहे .कट्टर शिवसैनिक मैदान सोडून पळत नाही. दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडक सरकार झाल आहे. तेव्हा आम्हाला कमी समजू नका अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला आहे.
आझाद मैदान येथील दसरा मेळाव्यात बोलताना शिंदे म्हणाले आपण का उठाव केला हे सांगायची गरज नाही. अन्याय होत होता. म्हणून उठाव केला. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले. परदेशी गुंतवणूक, महिला सक्षमीकरण ,उद्योगांमध्ये पहिला नंबर वर आज महाराष्ट्र आहे. सत्तांतर झाले नसते तर लाखो कोटी रुपयांच्या योजना आल्या नसत्या. लाडकी बहीण योजना आली नसती. जेष्ठांना सवलती मिळाल्या नसत्या .परंतु आज मात्र महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय. उद्योग धंदे येतायत. लोकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या दिल्या जात आहे .सर्व थरातल्या लोकांना या सरकारने मदत केलेली आहे. त्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता नाही. कोणी कितीही आमच्यावर टीका करू त्यांना आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

error: Content is protected !!