ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्रिपुरा दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात

त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद दोन दिवसांपासून उमटत आहे संपूर्ण महाराष्ट्रात
मुंबई- त्रिपुरतील वादग्रस्त घटनेचे महाराष्ट्रात जे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामागे माजी खासदार वसीम रिझवी यांचा हात आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वसीम रिझवी हे वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष असून २०१७ मध्ये त्यांच्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत गंभीर आरोप झाले आहेत ते पूर्वी सपाचे नगरसेवक होते मात्र बाबरी मस्जिद तसेच केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना २०१२ मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते त्यामुळे वासिंम रिझवी यांच्यासारख्या लोकांवर सरकारने कारवाई करायला हवी, यावेळी मलिक यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आव्हान केले.
दरम्यान काल अमरावती हिंसक वळण लागले होते जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना काल सुधा घडल्या त्यामुळे शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले दरम्यान जातीय तणाव निर्माण करून लोकांना भडकवणे हे भाजपचे काम असून पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळ सुरू करण्यात आले असून लोकांनी त्यांच्या या कारस्थनाला बळीी पडू नये असे आव्हान प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी केेले

error: Content is protected !!