ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अरे पुन्हा वर्चस्वाच्या पेटवा मशाली..


शिवसेनेतील फुटी नंतर महाराष्ट्रात जे काही घडतं आहे ते महाराष्ट्रातील प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसासाठी वेदनादायी आहे.कारण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली होती . पण त्यांच्या पश्चात शिवसेना या नावाची अशा प्रकारे दुर्दशा होईल असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते .जे काही सुरू आहे त्याचा फक्त भाजपला आनंद झाला आहे पण महाराष्ट्र मात्र तळमळतो आहे.कारण हे सर्व पुन्हा उभ करणे वाटते तेवढे सोपे नाही .त्यासाठी खूप कष्ट सोसावे लागणार आहे पुन्हा एकदा निष्ठावान शिवसैनिकांना त्यांच्या आयुष्याच्या मशाली पेटवायला लागणार आहेत.कारण मराठी माणसांसाठी शिवसेना पहिला आणि शेवटचा पर्याय आहे.त्यामुळे शिवसेनेत भविष्यात गद्दार निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे तसेच मुन्नाभाई सारख्या भुरट्या पासून सावध राहावे लागणार आहे . कारण कुऱ्हाडी चां दांडा गो तास काळ ठरतो याबाबत इतिहास साक्ष आहे .तेंव्हा सर्वांना तपासून घेऊनच शिवसेनेने पुढील वाटचाल करायला हवे.तरच महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस वाचू शकेल. अन्यथा महाराष्ट्राचा एक एक लचका तोडण्यासाठी जे टपलेले आहेत त्यांना बळ मिळेल आणि शिवरायांचा हा महाराष्ट्र कायमचा मराठी माणसाच्या हातून जाईल. शिवसेनेतून जे फुटले आहेत त्यांना आज भलेही चांगले दिवस आलेले असेल तरी त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांचा आणि त्यांच्या मतदारांचा विश्वास गमावला आहे त्यामुळे महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही .

आज जे कुणी महाराष्ट्राच्या सतेत आहेत .त्यांचंकडून महाराष्ट्राला कोणतीही अपेक्षा नाही त्यांना सर्वात प्रथम महाराष्ट्र पासून विदर्भ वेगळा करून महाराष्ट्राचे 2 तुकडे करायचे आहेत त्यानंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे महाराष्ट्रातच येण्यास उत्सुक असलेले उद्योग धंदे गुजरातला नेऊन मुंबई महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं आहे आणि अशा लोकांच्या विरोधात फक्त शिवसेनच लढू शकतो याची त्यांना कल्पना असल्यामुळेच त्यांनी वेल प्लॅन शिवसेना फोडली पण शिवसेना फुटली म्हणून संपली नाही .उलट या फुटी मधून शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेईल असा महाराष्ट्रातील मराठी माणसाला पूर्ण विश्वास आहे आणि हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिवसैनिकांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे .गद्दार लोकांना महाराष्ट्राच्या गावागावात रोखावे लागणार आहे त्यांना महाराष्ट्र कसा भाजपच्या ताब्यात द्यायचा आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे लागणार आहे .

error: Content is protected !!