ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला- पाच जणांचा मृत्यू


मुंबई/बुधवारी आषाढी एकादशी निमित्त मुंबईवरून खाजगी बसणे पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला पनवेल जवळ भीषण अपघात झाला समोर आलेल्या ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने बस डावीकडे वळवली पण नियंत्रण सुटल्याने ही बस 20 फूट खोल दरीत कोसळली या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला या घटनेबद्दल सर्वांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे या बस मध्ये 54 भाविक होते आणि हे सर्व आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघाले होते पण रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि बचाव पथकाली घटनास्थळी धाव घेतली तसेच स्थानिकांच्या मदतीने बसमधील जखमींना बाहेर काढल्याने एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल कर दाखल केली तसेच अपघात जास्त बस क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली या अपघातात हौसाबाई पाटील गुरुनाथ पाटील यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत

error: Content is protected !!