ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

या सर्व डोम कावळे आम्ही पुरून उरणार आहोत-फडणवीस यांच सरकारला उघड आव्हान

मुंबई/सकाळी बांग देणारे कोंबडे आता दुपारीही बांग द्यायला लागले आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जात आहे . आपल्यावरील आरोप झाकण्यासाठीच मलिक आणि त्यांच्या साथीदारांनी दंगलींना प्रोत्साहन दिले आणि भाजप वर उलट आरोप करीत आहेत पण अशा डोंबकावळ्यांना आम्ही पुरून उरू असे उघड आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.
राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजायला लागलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाआता मुख्यमंत्री म्हणून कोण मानायलाच तयार नाही.राज्यात सत्ताधाऱ्यांकडून नुसती वाटमारी सुरू आहे.राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध उघड झाले आहेत.अवैध रेती,अवैध,जुगार गावोगावी सुरू आहे राज्याचे गुन्हेगारीकरण झालेय.महाराष्ट्राची अशी कधीच अवस्था झाली नव्हती असा आरोप फडणवीस यांनी केलाय .ते पुढे म्हणाले.आमच्याकडे इनामिही नाही आणि बनमिही नाही त्यामुळे आम्ही कुणालाही घबराात नाही असेही ते म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार हे महाराष्ट्रातील आता पर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे .सध्या इथे कायद्याचे नाही तर काय द्यायचे यांचे सरकारने आहे.त्यामुळे या सरकारच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची काल बैठक झाली या बैठकीवेळी मुद्द्यांवर बोलताना फडणवीस यांनी आघाडी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले.

error: Content is protected !!