ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेंव्हा महाराष्ट्रात दाखल झाली तेंव्हा सावरकर हे इंग्रजाचे नोकर होते त्यांना इंग्रज सरकार कडून पेन्शन मिळत होती असे विधान केले होते त्याला शिंदे गट आणि भाजपने तीव्र आक्षेप घेत शिंदे गटांचे राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींची यात्रा सरकारने थांबवावी अशी मागणी केली होती . तर राहुल गांधी सारख्या लोकांचे विचार गाडून टाकायला हवेत असे फडणवीस यांनी सांगितले त्याला प्रती आव्हान देत हिंमत असेल तर भारत जोडो यंत्रणा थांबवून दाखवा असे आव्हान दिले आहे त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे .

error: Content is protected !!