ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

आता मुंबई महापालिका जिकण्या पासून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही -बाबूभाई भवानजी


मुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईत जो प्रचंडप्रतिसाद मिळाला आहे तो पाहता आता मुंबई महापालिका जिंकण्यापसून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही असे माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे. आज राणे यांचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले .यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ,आशीष शेलार ,कृपाशंकर सिंह ,मंगल प्रभात लोढा,योगेश सागर .नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमदार नितेश आणि निलेश यांच्यासह हजारो कार्यकर्ते भर पावसात हजार होते यावेळी राणे म्हणाले की माझ्यावर पंतप्रधानी आणि पक्षाने जी जबाबदारी सोपवली आहे ती पार पडण्यासाठी मी जीवाचे रान करीन .मुंबई महापालिकेत आता भाजपचीच सत्ता येणार असून सेनेच्या ३२वर्षांच्या पापाचा घडा आता भरला आहे. त्यामुळे पालिकेत आता भाजपची आता येणार आहे .राणेंची यात्रा विमानतळावरून कला नगर येथे आली तिथे त्यांचे भाषण झाले यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रात माझा जन्म झाला येथे मी वाढलो त्यामुळे महाराष्ट्रात फिरण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही .महा विकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात राज्याचे खूप नुकसान केले त्यामुळे आता हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना महापालिकेतून आणि राज्याच्या सरकारमधून हटवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे .नंतर ते शिवतीर्थावर गेले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ते भाऊक झाली होते ते म्हणाले बाळासाहेब आज मला आशीर्वाद द्यायला तुम्ही हवे होते. तुमची खूप आठवण येते
नारायण राणे यांच्या या जन आशीर्वाद यात्रे मुळे महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबई मधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आता मुंबई आणि महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपच असेल असा विश्वास बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!