ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?

मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.
गोरेगावच्या पत्रचाल पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत हेच असल्याची माहिती इडी च्या अधिकाऱ्यांकडे आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना फसवण्यात आले . पत्राचाळ भूखंडाचा विकास करण्याच्या नावाने गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला . आणि परस्पर हा भूखंड दुसऱ्याला विकण्यात आला त्यामुळे इथे राहणारे रहिवाशी देशोधडीला लागले .याच प्रकरणात संजय राऊत आता आहेत दरम्यान आता यात शरद पवारांचे नाव घेतले जात आहे .तसे पत्र अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पाठवले आहे . आणि पवारांच्या चौकशीची मागणी केली कारण इडीच्या चार्जशीट मध्ये लिहले आहे की पवार कृषीमंत्री होते . तेंव्हा वाय बी सेंटरला म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊत यांच्या पत्रचाळ संदर्भात बैठका झाल्या . त्यानंतरच वादवांन याला प्रकल्प देण्यात आला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्या ठिकाणी हजर होते .अर्थात चार्जशीट मध्ये पवारांचे नाव नाही मात्र तरीही पवारांचे नाव घेतले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .

error: Content is protected !!