ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

Hello, Hi ऐवजी ‘जय हिंद’ म्हणा, यातूनच राष्ट्रप्रेम दिसेल

                        अभिनेता विक्की कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ची जोरदार चर्चा रंगत आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना ‘सर्जिकल स्ट्राइक’मधून सडेतोड उत्तर दिलं.  या सिनेमातून पुन्हा एकदा तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. देशभक्तीवर आधारित हा सिनेमा प्रत्येकामध्ये एक प्रकारचा ‘Josh’ निर्माण करत आहे. 

आजची तरूणाई देखील यामधून प्रेरणा घेत आहे. पण हा तरूणाईचा ‘Josh’ अगदी काही दिवसांचा असेल आणि पुन्हा ही युवापिढी आपल्या मोबाइलमध्ये आणि गेम्समध्ये व्यस्त होतील असं साऱ्यांनाच वाटत असेल. पण असं असेलच असं नाही कांदिवलीच्या बालभारती महाविद्यालयात प्राध्यापिका /व्याख्याती म्हणून काम करतांना विद्यार्थ्यांसमोर आणि समाजासमोर एक अनोखी भूमिका मांडण्याची संधी मला मिळाली.

‘१५ ऑगस्ट’ किंवा ‘२६ जानेवारी’लाच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागी होते, असा अनेकांचा समज असतो. पण मी विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली गोष्ट रूजवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी शिक्षक समोर आले की, कधी आदराने तर कधी भीतिपोटी त्यांना हॅलो सर किंवा हॅलोगुरू म्हणतात त्याऐवजी  ‘जय हिंद’चा मंत्र दिला.

देशाप्रती फक्त २ दिवसंच प्रेम आणि आदर व्यक्त न करता हा आदर मनात कायमच असावा या भावनेपोटी हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्यात आला. आपल्या प्रत्येक कामातून देशाचं हित कसं राखलं जाईल हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. पण हा नुसता दिखावा बाजूला सारून त्या विद्यार्थ्यांमध्ये  देशभक्तीचा सकारात्मक विचार रूजवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी शिक्षक समोर भेटल्यावर ‘Hi’ किंवा ‘Hello’ करून देखल्या देवा दंडवत करतात. पण यावर मी  एक नामी युक्ती लढवली. विद्यार्थ्यांनी मला पाहताच  ‘जय हिंद’ म्हणावं. पण तेही म्हणताना मनात I Love My Country, I Respect My Country आणि  I am greatful to My Country असा भाव असणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर ‘जय हिंद’ म्हणताना उजवा हात डाव्या छातीवर ठेवून अगदी सैनिकाप्रमाणे ‘जय हिंद’ करावं. 

गेल्या २० वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असतांना १० ते १२ वर्षांपासून हा नवा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये रूजवला आणि आज मला या गोष्टीचा आनंद  आहे की, विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेलं हे छोटंसं रोपटं आज बहरू लागलं आहे. विद्यार्थी फक्त महाविद्यालयाच्या आवारातच नाही तर कुठेही भेटल्यावर  माझ्याशी ‘जय हिंद’ बोलून संभाषणाला सुरुवात करतात. एवढंच काय तर ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे ते विद्यार्थी देखील कुठेही भेटले तरी ‘जय हिंद’ म्हणतात. मी सुरु केलेला हा विचार आता विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रूजला आहे. पालकांना तर शाळेतील इतर शिक्षकांना देखील या गोष्टीचा खूप आनंद असून अभिमान वाटतो. राष्ट्रप्रेमाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे समाधान मला लाभले. हा विचार सर्वत्र पोहोचायला हवा आणि अंमलात यायला हवा. खरं नां ?    -प्रा. सौ. नयना रेगे, बोरीवली पूर्व. (लेखिका या महाविद्यालयात व्याख्यात्या आहेत.)

error: Content is protected !!