ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

हेडफोन व मोबाईलच्या किरकोळ वादातून मित्राने केली मित्राची हत्या.

उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे उर्फ शिवड्या आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता.यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.हेडफोन मागण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि याच किरकोळ वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तिथेच टाकून सूरज पसार झाला. सकाळी याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आणि या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली.तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली.त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्ह्याया थोरात, गुन्हे प्रकटीकरण हर्षल राजपूत,निलेश तायडे, रोहितदास बुधवंत, हरिश्चंद्र घाणे,पांडुरंग पथवे,समीर गायकवाड,गणेश राठोड, वैजीनाथ राख,कृपाल रोकडे,हनुमंत सानप,मंगेश वीर यांनी कामगिरी केली आहे.

error: Content is protected !!