ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

भिवंडी शहरात १५ लाख रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यास शांतीनगर पोलिसांना यश

भिवंडी दि 25(आकाश गायकवाड  )शहरात  मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीचे विविध मोबाईल कंपन्यांचे शंभर मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यास शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. 

शांतीनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शांतीनगर पोलिसांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपस करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तपास पथके तयार करून शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत चोरीला गेलेले शंभर मोबाईल चरट्यांकडून हस्तगत केले. शुक्रवारी पोलीस संकुल येथे नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्यासह शांतीनगर पोलीस प्रशासनाचे आभार मानले. 

error: Content is protected !!