ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

पुढील टार्गेट काँग्रेस राष्ट्रवादी!

या देशातून इंग्रज भलेही गेले असले तरी त्यांनी फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीचा वारसा मात्र येथे ठेऊन गेलेत.त्यामुळेच भारतात फोडा फोडीचे राजकारण सुरू आहे .आणि आजकाल राजकारणात निष्ठा, नीतिमत्ता, चारित्र्य याना कावडीचीही किंमत राहिलेली नसल्याने कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.तसेच राजकारणात सध्या सर्वच सत्तलोभी असल्याने निष्ठा वैगेरे सोडून सतेच्या मागे धावणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षात फूट पाडून सत्ता मिळवली जाते.हे त्याचेच उदाहरण आहे पण जे लोक वर्षं वर्ष शिवसेनेत राहून अब्जाधीश झाले आणि आता सतेसाठी भाजप सोबत गेले ते भाजपशी तरी प्रामाणिक राहतील याची काय शाश्वती? पण त्यांच्या बंडखोरी पेक्षा त्यांना बंडखोरी करायला लावणारे लोक अधिक भयंकर आहेत.जे स्स्वार्थासाठी एखाद्या पक्षात (फूट पाडू शकतात ते स्वतःच्या फायद्यासाठी समाजात आणि देशात सुधा फूट पाधायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि शिवसेनेत फूट पडल्यावर आता त्यांचे लक्ष काँग्रेस राष्ट्रवादीवर आहे .

error: Content is protected !!