ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

प्रकाश आंबेडकर हे नेहमी नवा इतिहास लिहतात औरंगजेबाच्या तारिफीवर फडणवीसांचा हल्लाबोल


मुंबई – संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदुंचा सहभाग होता, या प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असं आहे की, प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. तिथे त्यांनी जे वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी ऐकलं आहे. हिंदू असो वा कुणीही असो, हे सगळ्यांना माहीत आहे की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले होते.”
“औरंगाजेबाने हे अत्याचार आणि छळ करण्याचं एकमेव कारण होतं, ते म्हणजे, संभाजी महाराज सातत्याने देव, देश आणि धर्माची लढाई लढत होते. संभाजी महाराजांना ती लढाई सोडून आपला धर्म बदलावा, आमच्या धर्मात या आणि आम्हाला नतमस्तव व्हा, असं सांगितलं जात होतं. पण छत्रपती शिवरायांच्या छाव्याने अत्याचार सहन केले. पण औरंगजेबाची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने त्यांना मारलं आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असा टोला फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.

error: Content is protected !!