ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बॉलिवूड मधील मोगली भाईजान

सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या देशातील विचारवंतांची एक नवी ओळख निर्माण झालेली आहे.त्यामुळेच शारुखखान पासून कबीर खान पर्यंत कला क्षेत्रातील सगळेच विचारवंत त्यांच्या धर्माशी इमान राखून जातीसाठी माती खायला तयार असतात. त्यांच्या विषयी जर कुणी काही बोलला तर त्याला जातीयवादी ठरवले जाते.पण कलाक्षेत्रातील याच विचारवंतांना निरपराध लोकांवर आणि महिलांवर अत्याचार करणारे तालिबानी मात्र आल्ल्ह चे नेक बंदे वाटतात.हिंदुस्तानचे लचके तोडणारे मोघल हे सच्चे मुसलमान वाटतात. भारत पाकिस्तान संबध सारख्या नाजूक विषयावर भाईजान सारखा चित्रपट बनवणाऱ्या कबीर खान याला आजकाल मुघलांचा पुळका आलाय.त्याच्या मते मोघल हे देश उभारणारे खरे शासक होते त्यामुळे मुघलांना कमी लेखणे चित्रपट पाहणे हे अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते असे कबीर खानचे म्हणणे आहे.बरोबर आहे त्याचे कारण मुघल कबिरचे जातभाई आहेत त्यामुळे इतिहासाच्या पाना पाणा वर रेखाटलेला मोगलांचा विश्र्वासघातकी आणि रक्त रणजीत इतिहास कबीर खानच्या कसा काय पचनी पडेल.मोघल हे काही भारतीय नव्हते तर ते पर्शियन आखतातून आलेले घुसखोर लुटारू होते .भारतातल्या राजा महाराजा मध्ये असलेल्या फाटा फुटीचा फायदा घेत त्यांनी लाखो निरपराध हिंदूंच्या कतली करून भारतात त्यांचे मुघल साम्राज्य उभे केले.आणि ते टिकवण्यासाठी आणि राजगादी मिळवण्यासाठी प्रत्येक मोघल सम्राटाने त्याच्या बापाचा खून करून राजगादी बळकावली.पहिला मुघल सम्राट बाबर याचा त्याच्या मुलाने म्हणजेच हुमायून ने खून केला,हुमायून चां अकबराने खून केला,अकबराचा शहाजान ने खून केला तर या सर्वांवर कडी केली ती क्रूरकर्मा औरंगजेबाने ! त्याने आपल्या बापाचा म्हणजे शहाजहान याच्या सकट भाऊ दारा सुकोह याचाही खून केला. हा मोगलांचा रक्तरंजित इतिहास ठाऊक असूनही जर कबीर खान याला मोघल अल्ला चे नेक बनदे होते असे वाटत असेल तर त्याने हा देश सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मध्ये जावे.तिथे त्याच्या या तालिबानी विचारांची अधिक कदर केली जाईल

error: Content is protected !!