ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबईराजकीय

तर ऍक्शनला रियाक्षण होणारच शिवसेनेचा राणेंना इशारा

रत्नागिरी/ राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे जबाबदारीने वागायला हवे अन्यभा ऍक्शन ला रिअक्शन होणारच आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे हा एक प्रकारे राणेंना अप्रत्यक्ष इशाराच म्हणावा लागेल
राणेंची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुढे सिध्दु दुर्ग जिल्ह्यात गेल्यावर तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला लोक त्यांच्या स्वागताला रात्री ११वाजेपर्यंत उभे होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .यात्रा सुरळीत सुरू होती.दरम्यान राणे यांच्यामुळे भाजपची पिछेहाट होत असून त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे .त्यांच्या मुलांनी त्यांना सांभाळायला हवे असे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष मिटेल असे तूर्तास तरी वाटत नाही

error: Content is protected !!