ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी


वसई-नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात नायगाव पूर्वेच्या जूचंद्र वाकीपाडा येथील भागात कॉस पावर नावाचा कारखाना आहे. बुधवारी अचानकपणे स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्या(साठी असलेले बारा कामगार होरपळले. यातील सात जण जखमी झाली आहेत. वैष्णवी, भावेश, जयदीप राव, सागर, हर्षला व अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. तर अजय व अन्य दोन जणांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी पाठविले आहेत. तसेच याप्रकरणी वालीव पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. या स्फोटाची भीषणता इतकी होती की त्याचे हादरे आजूबाजूच्या परिसराला बसले.
या घटनेनंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या या स्फोटाची तिव्रताच इतकी होती की, या स्फोटामुळे आजुबाजूच्या घरातील काचेच्या खिडक्यांना तडा गेल्या आहेत. तर स्फोटाचा आवाज तब्बल 1 किलोमिटर परिसरातपर्यंत ऐकायला गेला आहे. नायगाव पूर्वेतील वाकीपाडा, पाझर रोड लगत सदरची कंपनी आहे. या कंपनीत एकूण 50 कामगार कामावर आहेत. मात्र घटनेच्या दिवशी केवळ 25 ते 30 कामगार उपस्थित होते. दुपारच्या सुमारास हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन यात 3 कामगार जागीच दगावले आहेत. तर 10 ते 12 कामगार गंभीर आहेत. मृत्तांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात येते. दरम्यान, वाकीपाड्यात अनधिकृत कारखाने, औद्योगिक गाळे बेसुमाररित्या वाढत आहेत. कामण, चिंचोटी, पोमण, कोल्ही, देवदळ, बापाणे, राजावली या परिसरात हे कारखाने स्थिरावले आहेत. कारखान्यांत औद्योगिक सुरक्षा धाब्यावर बसवून उत्पादनप्रक्रिया राबवली जात असल्याचे चित्र समोर येते. दरम्यान, आजच्या दुर्घटनेनंतर वसईच्या प्रदुषणाला हातभार लावणार्‍या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष का होते आहे, यामागे काही अर्थपूर्ण धागेदोरे आहेत याची चौकशी या घटनेनंतर होणे संयुक्तिक असल्याचे आवाहन सुज्ञ नागरिकांनी केले आहे. वसईतील कारखाने आणि औद्योगिक सुरक्षा हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक ग्रामपंचायतीच्या कारभारावरदेखील टिका होऊ लागली आहे.अग्निपरिक्षण, उद्वाहन परिक्षण, विद्यूत संच मांडणी परिक्षण व औद्योगिक सुरक्षा वार्‍यावर असल्याचे दिसून येते कारण विरारच्या विजय वल्लभ दुर्घटनेनंतर वसईतील अग्निपरिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र सदर प्रकरण थंड झाल्यानंतर अग्निपरिक्षणासारखा मुद्दा शासकीय दरबारी पुन्हा धुळखात पडला आहे. त्याचबरोबर उद्वाहन परिक्षण, विद्युत संच मांडणी या मुद्दांनाही धुळ बसली आहे. वाकीपाडा दुर्घटनेनंतर वसईतील प्रदुषणकारी, धोकादायक कारखाने आता तरी बंद होतील का? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

error: Content is protected !!