ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भारतात तालिबानी उन्माद


भारत हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जायचा पण आता या देशाची टी खरी ओळख पुसली गेली कारण धार्मिक राडेबजीला उत आलाय आणि सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने हा देश लवकरच धार्मिक दहशतवाद बाबत पाकिस्तान च्या पुढे जाण्याची शक्यता आहे .काल पतियाळा येथे शिवसेना आणि खलिस्तानी एकमेकांना भिडले आणि मोठा राडा झाला.दोन्ही बाजूकडून लाठ्या कथा आणि तलवारी उपसण्यात आल्या .आता या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटतील अगोदरच मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून देशातील वातावरण तापलेले असताना जर खलिस्तानी पुन्हा सक्रिय झाले तर देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काही खरे नाही .कारण खलिस्तानी हे पकिस्तानी दहशत प्रमाणेच खतरनाक आहेत.काही वर्षांपूर्वी बब्बर खालसा आणि भिद्रेनवाला यांनी खलिस्तांच्या मागणीसाठी जो रक्तरंजित उच्छाद मांडला होता त्यात हजारो निरपराध लोकांचा बळी गेला .या खलिस्तान वादयाने चक्क शिखांच्या अवित्र सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता आणि त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन कारवाई अंतर्गत सुवर्ण मंदिरात लष्कर घुस्ववे लागले होते.त्यात भिंद्रनवाले. ब्लू स्टार आणि त्याचे साथीदार मारले गेले त्याचा बदला घेण्यासाठी खलिस्तानी अतिरेक्यांनी तत्कालीन पंत प्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केली होती तेच खलिस्तानी दहशतवादी आज पुन्हा सक्रिय झाले आहेत

error: Content is protected !!