ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

रामनवमीच्या यज्ञाला इंदोरमध्ये गालबोट


मंदिराच्या विहिरीवरील छत कोसळून १५ भाविकांचा मृत्यू
भोपाळ – आज सर्वत्र रामनवमीचा उत्साह सुरु असतानाच मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये एक भयंकर दुर्घटना घडली. मंदिरात रामनवमी निमित्त यद्न्य सुरु असतानाच मंदिरातील विहिरवरचे छत कोसळून अनेक भाविक विहिरीत पडले या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील प्राचीन बावडीच्या (मोठी विहीर) छतावर मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि त्याचा भार सहन न झाल्याने ते छत कोसळलं. रामनवमीचा उत्सव सुरू असताना ही घटना घडली.
रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मंदिरात हजर होते. लोक पूजा अर्चा करत होते. तर त्यात मंदिरात एक पायऱ्यांची विहिर होती, ज्यावर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी २० ते२५ लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं. छत कोसळल्याने सर्वजण विहिरीत पडले. दरम्यान ही विहीर सुमारे ५० फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासह सर्व एमआयसी सदस्य बैठक सोडून अपघातस्थळी निघाले.
दरम्यान बेलेश्वर महादेव मंदिरातील या दुर्घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. शिवराज सिंह यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना फोन करुन बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत्याने संपर्कात आहे

error: Content is protected !!