ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल -राज ठाकरे

मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे यांनी दिला आहे . काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .दरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला करताना यात्रा मेळावे बिनबोभाट होतात .मग सन ‘ उत्सवांच्या वेळेसच कोरोंना कसं पसरतो ? असा सवाल करून आता सर्व सुरू झालेल आहे . त्यामुळे मंदिरे खूले करावीत अन्यथा मनसे यापुढे घंटानाद आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिलाय .त्याच बरोबर इतके दिवस शांत बसलेले अन्न हजारे आताच कसे प्रकट झाले असा सवालही त्यांनी केला

error: Content is protected !!