ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाराषट्रात एकाच पक्षाचे सरकार येऊ शकत नाही – अमित शहाना अजित पवार यांचे सडेतोड उत्तर


मुंबई – २०२९ मध्ये राज्यात एकट्या भाजपचे सरकार आणायचे आहे त्यामुळे कामाला लागा असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे . त्याला सडेतोड उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाचे सरकार येऊ शकत नाही हा ४० वर्षांचा इतिहास आहे . अजित पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत
जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात, आपण केंद्रात सलग तिसरे सरकार बनवले. आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका असं अमित शाह आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. “मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार होईल. त्यासाठी जोमात काम करा. यंदा २०२४ ला महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. २०२९ मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचे आहे. यंदा फक्त ऐका, 2024 मध्ये युतीचे सरकार असेल. पण २०२९ मध्ये शुद्ध रुपाने कमळचे सरकार असेल”, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यात पोहोचली. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांचं भाषण झालं. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी अजित पवार यांना अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. १९८५ नंतर जवळपास ४० वर्षे एका पक्षाचं सरकार कधीचं आलं नाही. इतर राज्यांची आणि महाराष्ट्राची परिस्थितीत वेगळी आहे. भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आजच्या परिस्थितीत एका पक्षावर सरकार येवू शकत नाही. महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांचं मोरल वाढवण्यासाठी, त्या हेतून त्यांनी सांगितलं असेल, मला माहिती नाही. भाजपला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

error: Content is protected !!