ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

सरकार अखेर नमले दोन डोस घेलेल्याना लोकलचे तिकीट मिळणार


मुंबई/ एन सणासुदीच्या काळात रेल्वे तिकीट बंद करून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या रेल्वे आणि राज्य सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष पसरताच राज्य सरकारने रेल्वेला विनंती करून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट देण्याची विनंती केली त्यामुळे आता रेल्वेच्या तिकीट विंडोवर पुन्हा तिकीट मिळायला सुरुवात झाली आहे .
दिवाळीच्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर लोक घरातून बाहेर पडतील आणि लोकल ट्रेनने प्रवास करतील त्यामुळे लोकल ट्रेनला गर्दी होऊन करेनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी सरकारला भीती वाटत होती म्हणून सरकारने रेल्वेचे तिकीट बंद केले आणि दोन डोस घेतलेल्यांना महिन्याच्या पासावराच रेल्वे प्रवास करता येईल असा निर्णय घेतला पण त्या विरुद्ध मुंबईकर जनतेत असंतोष उसलतच सरकारला दोन दिवसात हा निर्णय मागे घ्यावा लागला .

error: Content is protected !!